सलग तिस-या दिवशी भारताने जिंकले पाचवे पदक

hina-sidhu
इंचेऑन : भारतीय नेमबाजांनी सलग तिस-या दिवशी आशियाई क्रिडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सांघिक कांस्य पदक पटकावल्यामुळे भारताच्या खात्यात पाचवे पदक जमा झाले आहे.

भारताच्या हीना सिद्धू, राही सरनोबत आणि अनिसा सय्यद यांनी सांघिक स्पर्धेत ब्रॉंझ पदक मिळवले. पण १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेत अपयशाचा सामना करावा लागला. १० मीटर एअर पिस्तूल या प्रकारात भारताची अयोनिका पॉल सातव्या स्थानावर राहिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आयोनिकाने याच क्रीडा प्रकारात रौप्य पटकाविले होते. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एक सुवर्ण आणि चार ब्रॉंझ अशी कामगिरी केली आहे.

Leave a Comment