शिवसेनेशी आता चर्चा नाही – फडणवीस

devendra-fadnavis
मुंबई : भाजपने आपला अंतिम निर्णय घेतला असून त्यानुसार आता यापुढे शिवसेनेशी चर्चा करणार नसल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. त्यामुळे २५ वर्षांची अभेद्य युती संपुष्टात आली आहे. केवळ घोषणा होण्याचे बाकी आहे.

शिवसेना-भाजप युती तुटत असतांनाच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. शहा यांनी उद्धव यांना युती टिकवण्याचे आवाहन केले आहे. असे वृत्त हाती येत असताना मुंबईत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी चर्चा नाही, भाजपचा अंतिम निर्णय झाला आहे,असे सांगितल्यामुळे युती तोडण्यात भाजपने पुढाकार घेतल्याचे आता दिसून येत आहे.

शिवसेनेचा भाजपला अखेरचा प्रस्ताव दिला होता. १५१-११९-१८चा नवा फॉर्म्युला होता. शिवसेना ज्या ५९ जागांवर निवडणूक जिंकू शकलेली नाही, त्या जागांबाबत शिवसेनेनं विचार करावा. भाजप १९ जागांबाबत विचार करेल, असे अमित शहांनी उद्धव ठाकरेंना सांगितले आहे. दरम्यान, युतीबाबत उद्धव ठाकरेंचा निर्णय हा त्यांनी स्पष्ट केला असून त्यापुढे अजून किती वाट पाहायची, असे शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी सांगितले. आता देवेंद्र फडणवीस यांनी युती संपुष्टात आल्याचे स्पष्ट केले. आता युती संपुष्टात आल्याची कोण घोषणा करतो, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment