संघर्ष यात्रा संपली आणि परिवर्तन यात्रा सुरु झाली

amit-shah1
अहमदनगर – भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पंकजांने काढलेल्या पुन्हा संघर्ष यात्रेला मिळालेल्या प्रतिसादावरून यावेळी महाराष्ट्रात भाजपचेच सरकार येईल अशी मला खात्री पटली असे प्रतिपादन चौंडी येथे केले. आज पंकजा मुंडेंच्या संघर्ष यात्रेचा समारोप होत असून आजपासूनच भाजपाची परिवर्तन यात्रा सुरु होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आज नगर जिल्ह्यातील चौंडी येथे पंकजा मुंडेंच्या ‘पुन्हा संघर्ष यात्रे’चा समारोप झाला. त्यावेळी अमित शहा यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, प्रकाश शेंडगे, रावसाहेब दानवे, विजया रहाटकर, महादेव जानकर आदी नेते उपस्थित होते.

शहा म्हणाले, आज मला खूप आनंद होत आहे. पंकजाने दु:ख बाजूला ठेवले व जनतेत गेली व रस्त्यावर उतरून भाजपच्या परिवर्तन यात्रेत सहभागी झाली. गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न करण्यासाठी यात्रा काढली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हा मिळालेला प्रतिसाद पाहता राज्यात भाजपचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. गोपीनाथ मुंडेंचे दुर्देवी निधन झाल्यामुळे भाजपचे व राज्याचे मोठे नुकसान झाले. ते गोरगरिबांचे व जमिनीवर काम करणारे लोकनेते होते. त्यांच्यासारखे लोकनेते आज खूप कमी आहेत. पण परमेश्वराच्या मनात काही और होते. ते आज आपल्यात नाहीत पण त्यांनी पाहिलेले स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. १५ वर्षापासून राज्यात आघाडीचे असलेले भ्रष्ट सरकार उलथावून टाकायचे आहे. महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करून भाजपयुक्त करा, असे आवाहन शहा यांनी उपस्थितांना केले.

Leave a Comment