राजू शेट्टींच्या स्वाभिमानीला हव्यात १३ जागा

raju-shetty
मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला किमान १३ जागा देण्याची मागणी केली आहे. त्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

महायुतीकडून राज्यातल्या जनतेला मोठ्या अपेक्षा असल्यामुळे जागावाटपाचा तिढा लवकर सोडवून प्रचाराकडे लक्ष द्यावे असा सल्लाही त्यांनी यावेळी सेना-भाजपच्या नेत्यांना दिला.

अवघ्या काही दिवसांवर निवडणुका आल्या असतानाही जागावाटपांचा तिढा अजूनही सुटलेला नसल्यामुळे महायुतीतल्या घटक पक्षांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे घटकपक्षांकडून जागावाटपाच्या निर्णयाची घाई सुरू आहे.

भाजपकडून जागावाटपासाठी अडवणूक केली जात असल्यामुऴे त्यांना हा तिढा न ताणता जागावाटप लवकरात लवकर सोडवावा अशी भूमिका राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment