नवी मुंबई – काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरुन आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे असून जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीने नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार उभा करण्याची भूमिका घेतली आहे. याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचा नवी मुबंई हा बालेकिल्ला आहे. काँग्रेस थेट गणेश नाईक यांच्या विरोधातच उमेदवार उभा करणार असल्यामुळे गणेश नाईक यांच्यासाठी विधानसभेची वाट बिकट ठरणार आहे.
नवी मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र यामुळे निर्माण झाले आहे.