नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या नावाने क्रिकेट मालिका सुरू करण्याचा विचार करत असून बीसीसीआयच्या गेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. असे बीसीसीआयच्या अधिका-यांनी सांगितले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चॅम्पियन लीगनंतर भारतात होणाऱ्या भारत आणि वेस्टइंडीज यांच्यामध्ये मालिकेला भारतरत्न सचिन तेंडुलकरचे नाव दिले जावू शकते. या संदर्भात २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआय याची घोषणा करू शकते.
चॅम्पियन लीगनंतर होणाऱ्या भारत-वेस्ट इंडीज मालिकेला सचिनचे नाव दिले जाऊ शकते. सचिनसारख्या महान खेळाडूच्या नावाची मालिका विचार करून सुरू करु. हा सचिनचा सन्मानच असेल, असे बीसीसीआयचे संजय पटेल यांनी सांगितले.