रिपाईला हव्या आहेत दोन आकडी जागा

ramdas
मुंबई – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर महायुतीला सन्माने दोन आकडी जागा देण्याची मागणी केली आहे. असे न झाल्यास आपल्याला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही आठवलेंनी महायुतीला दिला आहे.

आज मुंबईत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्यातील कार्यकारिणीची बैठक पार पडली. मुंबईतील चेंबुर जिमखाना येथे झालेल्या बैठकीनंतर आठवलेंनी आरपीआयला दोन आकडी देण्याची तसेच राज्यात येणाऱ्या सत्तेत १५ टक्के वाटाही त्यांनी मागितला आहे.

यावेळी बोलताना आठवलेंनी महायुती जर पाचसहाच जागा देत असतील तर आरपीआयला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा दिला आहे. तसेच भाजप सेनेसोबत रिपाई फरपट येणार नाही असेही आठवले म्हणतात. एक राज्यपाल पद रिपाईला मिळावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

Leave a Comment