जीवाच्या भितीने सोडली राष्ट्रवादी

kisan-kathore
कल्याण – आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीत माझ्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केला असून याबाबत शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याचेही कथोरे यांनी सांगितले.

मागील २ वर्षांपासून पक्षातील काही लोकांकडून त्रास होत असल्याची तक्रार आपण शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्याकडे करत होतो. मात्र, ते याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत कथोरे यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडताना व्यक्त केली आहे. मुरबाड येथील कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

कथोरे हे राष्ट्रवादीचे मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. माझी आमदारकी घालविण्यात राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी खुप मेहनत घेतली. १९९७ पासून स्वपक्षीय नेते माझ्याविरोधात काम करत आहेत.

पक्षात माझ्या जिवाला धोका असल्याची अजितदादांना कल्पना दिली होती. कुणापासून धोका आहे त्यांची नावं लवकरच उघड करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यावरही मला कोणत्याही कामाचे श्रेय मिळू यासाठी कामे करु दिली नसल्याचा आरोप कथोरे यांनी केला.

Leave a Comment