आज इंग्लंड-भारत यांच्यात अखेरचा एकदिवसीय सामना

team-india
इंग्लंड – कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची एकदिवसीय मालिका सहज खिशात टाकल्याने शेवटचा एक दिवशी सामना जिंकण्याचा निर्धार केला आहे.

इंग्लंडला पाचव्या व अखेरच्या एकदिवसीय लढतीत विजय मिळवत ‘क्लिन स्वीप’ देण्यास उत्सुक असून कसोटी मालिका गमविणाऱ्या भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत चांगले यश संपादन केले.

पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर विश्व चॅम्पियन भारताने सलग तीन सामने जिंकत मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.

विजयाने मालिकेचा शेवट करण्यास शास्त्री आणि धोनी इच्छूक आहेत. इंग्लंडला वन-डे सामन्यांच्या मालिकेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. भारतीय गोलंदाजांनी या मालिकेत वर्चस्व गाजवले.

अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन या सलामीवीरांनी चांगली कामगिरी केली आहे. यानंतरच्या लढतीतही रहाणे-धवन यांच्याकडून डावाची सुरुवात करण्यास उत्सुक असल्याचे संकेत कर्णधार धोनीने दिले आहे. त्यामुळे ही संधी ते कसे पार पाडतात, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment