पाच राज्यांवर भारनियमनाचे संकट

load-shedding
मुंबई : वीज संकटावर विचार-विनिमय करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याची बैठक बोलविण्याचा आग्रह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. देशातील पाच राज्यांवर वीजेचे संकट आहे.

चव्हाण यांनी मोदी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, वीज टंचाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रिय उर्जामंत्री पीयूष गोयल यांची ३० ऑगस्टला मुंबईत भेट घेतली. या समस्येची व्यापकता लक्षात घेता वीज टंचाईचा राष्ट्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चर्चा होणे आवश्यक आहे. तसेच इंधनाच्या उपलब्धतेवर काही गंभीर समस्या निर्माण होत आहेत. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्याने वीज टंचाई मोठय़ा प्रमाणावर भासत आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर भारनियमनाचे संकट भेडसावत आहे.

Leave a Comment