मुंबईतील प्रसिद्ध गणपती माझापेपर वर
माझ्या ध्यानी मनी चिंचपोकळीचा चिंतामणी…
९६व्या वर्षातील चिंचपोकळीच्या चिंतामणीचे तेजस्वी रूप….
मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळख असलेला आणि लालबागच्या राजानंतर सर्वाधिक लोकप्रियता लाभलेला गणपती म्हणजे जीएसबी गणपती.
सन १९४७ साली गणेशोत्सव मंडळाने गणपती उत्सवाची सुरूवात केली. नरेपार्क मैदानात सर्व गणेश कार्यकर्ते एकत्र येवून या गणेशोत्सव मंडळाचा वटवृक्ष झाला. या सर्व कार्यात आजी व माजी सर्व कार्यकत्यांनी मोलाची कामे केली.
मुंबईतील माटुंगा विभागातील प्रगती मंडळाची गणेश मूर्ती
रंगारी बदक चाळीचा महाराजा म्हणून सर्वांना परिचीत असलेल्या ह्या गणपतीचे दर्शन झाले की मन अगदी प्रसन्न होते. काळाचौकी येथे जयहिंद टॉकिजजवळ असलेला हा गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा होतो. ह्या गणपतीचे वैशिष्ठ्य म्हणजे प्रत्येक वषीर् नवनवीन पौराणिक कथांचा देखावा चलतचित्रांच्या सहाय्याने तयार करणे. जनजागृतीसाठी टिळकांनी सुरु केलेला हा गणेशोत्सव आजही रंगारी बदक चाळीत सर्वधर्मसमभाव राखून एकत्रितपणे साजरा केला जातो.
गणेश गल्ली म्हणजे उंच मूर्ती तयार करणारं मुंबईतील सर्वात पहिलं मंडळ. आजही या मंडळाची मूर्ती २५ की २७ फुटी असते. दरवर्षी कशावर तरी विराजमान झालेली गणरायांची मूर्ती हे मंडळ साकारतं.
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्ती-करीता जनजागृती व्हावी याकरीता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली.लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाउढसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे इ.स. १९३४ साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात `श्री’ची स्थापना झाली. येथूनच `नवसाला पावणारा लालबागचा राजा’ म्हणून श्री ची मूर्ती प्रसिद्ध झाली.