राष्ट्रवादीची १४०ची मागणी काँग्रेसला अमान्य

congress
मुंबई – जागावाटपाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील तिढा अद्यापही कायम असून या दरम्यान राष्ट्रवादीने १४० जागांची मागणी केली आहे पण १२० पेक्षा अधिक जागा देण्यासाठी काँग्रेस तयार नसल्यामुळे आघाडीतील अडचण वाढली आहे.

आज आघाडीच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठांमध्ये राष्ट्रवादीने चर्चेच्या सुरुवातीलाच १४० जागांची मागणी केल्याने नाराजी सूर असून काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला १२० पेक्षा अधिक जागा दिल्या जाणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे.

दरम्यान, पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीने विधानसभेच्या सगळ्या २८८ मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या या मुलाखतींनंतर काँग्रेस चांगलीच नाराज झाली आहे.

Leave a Comment