पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द

pitch
ब्रिस्टल- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. या लढतीपूर्वीच हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र काही षटकांची लढत खेळण्यात येईल अशी शक्यता होती. मात्र रात्रभर सुरू असलेला पाऊस इंग्लंमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी दीड वाजेपर्यंत थांबलाच नसल्यामुळे लढत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. उभय संघांतील पाच वनडेंच्या मालिकेतील दुसरी लढत बुधवारी कार्डिफ येथे होणार आहे. तेथेही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment