कमी जागा मिळाल्यास महायुती तोडणार – सदाभाऊ खोत

sadabhau
औरंगाबाद – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आगामी विधान सभा निवडणुकीत १२ पेक्षा कमी जागा मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीला रामराम ठोकेल, असा स्पष्ट इशारा औरंगाबादमध्ये दिला असून याशिवाय महायुतीत भ्रष्टाचाऱ्यांची भरती सुरु झाल्याने त्याचे निवडणुकीत वाईट परिणाम होतील, अशी सूचनाही खोत यांनी केली.

याआधीच जागावाटपाच्या मागणीवरुन राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर आणि स्वाभिमानीच्या राजू शेट्टींनी परस्परविरोधी विधाने केली आहेत.

निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांना सोडचिठ्ठी देत सेना-भाजपात होणारे प्रवेशावरही शेट्टींनी टीका केल्यामुळे वरवर जरी सर्व काही ठिक असल्याची बतावणी महायुतीचे नेते जरी करत असले, तरी खोत यांच्या इशाऱ्याने महायुतीतली जागावाटपाची रस्सीखेच पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Leave a Comment