अशांत लिबियातून भारतीय मायदेशी

libiya
लिबिया – गेले कांही दिवस सातत्याने होत असलेले हिंसाचार, दंगे आणि त्यामुळे अशांत बनलेल्या परिस्थितीमुळे लिबियातून अनेक भारतीय मायदेशी परतू लागले आहेत. मंगळवारी २१६ भारतीय मायदेशी परतले असून आत्तापर्यंत परतलेल्या नागरिकांची संख्या २७५० वर गेली आहे.

लिबियात नोकरीमिमित्ताने हे भारतीय वास्तव्य करून आहेत. अशा प्रकारे तिकडे गेलेल्या भारतीयांची संख्या १८ हजारांवर आहे. तेथील खासगी कंपन्यांतून हे नागरिक नोकर्‍या करत आहेत. मात्र गेले कांही दिवस सातत्याने येथील परिस्थिती अशांत बनत चालल्याने तेथे राहणे सुरक्षित राहिलेले नाही. ही परिस्थिती सध्या तरी सुधारण्याची कोणतीही लक्षणे नाहीत त्यामुळे अजूनही तेथेच असलेले भारतीय नागरिक असुरक्षित वातावरणात असल्याचे परतलेल्या नागरिकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment