ठाण्यात एका गोविंदाचा हॉर्ट अटॅकने मृत्यू

dahi-handi17
मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीला चाप बसविला असला तरी आज सुरु असलेल्या दहीहंडी उत्सवात सुमारे ९३ गोविंदा जखमी झाले असून या दरम्यान, ठाण्यात लालबागच्या साईसदन गोविंदा पथकातील राजेंद्र आंबेकर या इसमाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या आदेशाची सर्वत्रच पायमल्ली होताना दिसत आहे.

दहीहंडी फोडताना मुंबईतील गिरगाव येथे थरावरून घसरून सुमारे १६ गोविंदा जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमी मुंबईतील विविध रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान संध्याकाळपर्यंत जखमी गोविंदांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई व ठाण्यातील प्रमुख रूग्णालयांनी गोविंदासाठी काही खाटा राखीव ठेवल्या आहेत. तसेच डॉक्टरांची पथकेही तयार ठेवली आहेत. जेजे हॉस्पिटल, केईएम, नायर व सायन हॉस्पिटलसारख्या रूग्णालयाचा समावेश आहे.

Leave a Comment