वेस्ट इंडिजच्या दौ-याचे वेळापत्रक जाहीर

BCCI
नवी दिल्ली – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणा-या कसोटी क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले असून हैदराबाद येथे ३० ऑक्टोबर रोजी दोन्ही संघादरम्यानचा पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे. तर कोची येथे आठ ऑक्टोबर रोजी पहिला एकदिवसीय सामना होईल असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सांगितले.

आठ ऑक्टोबर रोजी वेस्ट इंडिजच्या भारत दौ-याची सुरुवात होईल. पहिला एकदिवसीय सामना कोची येथे होईल. त्यानंतर दुसरा सामना विशाखापट्टणन ११ ऑक्टोबर रोजी येथे, तिसरा आणि चौथा सामना कटक आणि कोलकाता येथे १४ आणि १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर पाचवा आणि अंतिम एकदिवसीय सामना धर्मशाळा येथे होणार आहे.

दिल्लीत २२ ऑक्टोबर रोजी या दौ-यातील एकमेवर टी-२० सामना होणार आहे. त्यानंतर कसोटी सामन्यांच्या मालिकेला एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर सुरुवात होईल. हैदराबाद येथे ३० ऑक्टोबर रोजी पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. दुसरा कसोटी सामना बंगळूरु येथे सात ते ११ नोव्हेंबर दरम्यान होईल. तर अहमदाबाद येथे १५ ते १९ नोव्हेंबर दरम्यान तिसरा आणि अंतिम कसोटी सामना होईल.

Leave a Comment