सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच उडणार निवडणुकीचा बार !

vidhan-sabha
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीनंतर सर्वच पक्षांची जिव्हाळ्याची असणारी विधानसभा निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातच होण्याची शक्यता आहे. या दरम्यान महाराष्ट्र विधानसभेची मुदत 7 डिसेंबर अशी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिली होती. ही माहिती चुकीची असल्याचे विधीमंडळ सचिवांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

खर पाहता सात नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होणार असल्यामुळे त्याआधी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होऊन, नव्या सरकारची स्थापना होणे गरजेचे आहे.

महाराष्ट्राबरोबरच हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि झारखंड या चार राज्यांच्या विधानसभेच्याही निवडणुकाही सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यानच पार पडणार आहेत.

त्यामुळं आता पाऊसपाणी, थंडी-वारा अशा कुठल्याही विघ्नांना सामोरं जात सप्टेंबर – ऑक्टोबरमध्येच महाराष्ट्राची रणधुमाळी उरकली जाईल यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

Leave a Comment