काळी आई

farming
आपल्या शेतीचा सर्वात प्रमुख आणि महत्वाचा घटक म्हणजे जमीन आणि जमिनीतली काळी माती. ही माती काही सगळीकडे सारखी नाही. काही ठिकाणी ती पांढरीही आहे आणि देशाच्या काही भागात ती लालही आहे. पण तरीही जमिनीला ‘काळी आई’ म्हटले जाते. जगभरात जमिनीत मशागत करून आणि पिके घेऊन शेती केली जाते. माणूस सुधारला आणि चंद्रावरच नव्हे तर सूर्यावर जरी गेला तरी त्याला पोटाला खायला काही तरी लागतेच. त्याने कितीही प्रगती केली तरी हे सत्य काही बदलणार नाही. त्यामुळे मानवी जीवनात कितीही बदल झाले आणि परिवर्तने झाली तरीही पोटाची खळगी कायम आहे आणि त्यामुळे शेती व्यवसाय अटळ आहे, शाश्‍वत आहे. कधी काळी या पृथ्वीतलावरची शेतीच बंद झाली आहे असे काही घडणार नाही आणि शेती हा इतका शाश्‍वत धंदा असेल तर मातीचे महत्वही अबाधित आहे. तेव्हा आपण ज्या मातीत शेती करणार आहोत ती माती नेमकी काय आहे याची नीट माहिती करून घेतली पाहिजे. प्रत्येक शेतकरी हा काही किमान शास्त्रांची माहिती असणारा शास्त्रज्ञच असतो. नसेल तर तो तसा असला पाहिजे.

हे अशासाठी गरजेचे आहे की, आपल्या शेतातल्या मातीचा सुपीक थर म्हणजे काय आणि तो कसा तयार झालेला आहे हे त्याला माहीत असेल तरच त्याला त्या थराची किंमत कळेल आणि त्याचा लहानसाही थर वाहून जाता कामा नये याची तो खबरदारी घेईल. आपण ज्या मातीत मेहनत करतो ती माती मुळात खडकापासून तयार झाली आहे. ही पृथ्वी काही अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली आहे. ती नेमकी किती वर्षांपूर्वी अस्तित्वात आली यावर शास्त्रज्ञात वाद आहेत. प्रत्येकांच्या अंदाजात काही कोटी वर्षांचा ङ्गरक असेल. पण एवढे खरे की, ती अस्तित्वात आली तेव्हा तिच्या पृष्ठभागावर तीन चतुर्थांश पाणी होते आणि उरलेला एक चतुर्थांश भाग खडकाळ जमीन होती. म्हणजे आपण शेती करतो ती जमीन किंवा सुपीक माती या खडकांपासून बनलेली आहे. या खडकावर उष्णता, पाऊस, वारा, थंडी यांचे परिणाम होत गेले. दिवसभर उष्णता असते, त्यामुळे खडक तापून ङ्गुगते. रात्री तापमान कमी झाले की हेच ङ्गुगलेले खडक आकसत जाते. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे सुरू राहिली आणि सुरू आहे. हे ङ्गुगणे आणि आकसणे अतिशय सूक्ष्म असते. पण असे संस्कार होत होत दगडांची माती तयार व्हायला २५० कोटी वर्षांपेक्षाही अधिक काळ लागला आहे.

हे सर्व प्रकारच्या खडकांच्या बाबतीत घडते. काही खडक मुळात ठिसूळ असते, त्यांच्या बाबतीत ही क्रिया लवकर घडते. पण मातीचा एक ङ्गूट जाडीचा थर तयार व्हायला १०० वर्षे लागतात. हे अशासाठी सांगितले की, पावसाळ्यात जोरदार पावसाने शेतातली माती वाहून जाते, हे किती मोठे नुकसान आहे हे कळावे.

Leave a Comment