चौरंगी वनडे क्रिकेट स्पर्धेत चमकला तिवारी

manoj
डार्विन – भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघाचा चौरंगी वनडे क्रिकेट स्पर्धेत 5 गडय़ांनी पराभव केला असून भारताच्या मनोज तिवारीने 34 धावांत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ माघारी पाठविला.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया अ संघाचा डाव या सामन्यात 228 धावांवर आटोपला. सलामीच्या स्टोनीस आणि हय़ुजेस यांनी अर्धशतके झळकविताना प्रत्येकी 58 धावांचे योगदान दिले. त्यानंतर तिवारी आणि पटेल यांच्या अचूक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया अ चे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. नेव्हीलने 23 तर कटींगने 22 धावा केल्या. मनोज तिवारीने 5 गडी तर अमिष पटेल 30 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारत अ ने 47.5 षटकांत 5 गडय़ांच्या मोबदल्यात 231 धावा जमवित सामना जिंकला. अंबाती रायडूने 77 तर केदार जाधवने 52 धावांचे योगदान दिले. सॅमसन 49 धावांवर तर रसूल 20 धावांवर नाबाद राहिले. ऑस्ट्रेलिया अ तर्फे कमिन्स, मॅके, संधु, बॉईस व व्हाईट यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Leave a Comment