शिवसेना-भाजपने गाफील राहु नये, रामदास आठवलेंच्या कानपिचक्या

athvale
मुंबई – शिवसेना-भाजपने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे गाफील राहू नये, असा सल्ला महायुतीचा घटक पक्ष व रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी रिपाइंतर्फे मुंबईत आयोजित एका मेळाव्या दरम्यान दिला आहे.

आठवले म्हणाले, शिवसेना-भाजपने लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी अति आत्मविश्वासात राहू नये. याचा फटका त्यांना बसू शकतो. सध्या राज्यात सत्ताधा-यांविरोधात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे आघाडी सरकारला खाली खेचण्यासाठी महायुतीला प्रचंड मेहनत करावी लागेल. राज्यातील जनता ही दलितांवरील अत्याचार, भ्रष्टाचार व महागाईमुळे सत्ताधारी सरकारला कंटाळली असल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment