राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा – भारताचे सातवे सुवर्ण

jitu-rai
ग्लासगो(स्कॉटलंड) – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताने नेमबाजीत एकाच प्रकारातून पुन्हा दोन पदके मिळवण्याची कामगिरी भारताने तिस-यांदा केली. ५० मीटर पिस्तुल प्रकारात भारताच्या जितू राय याने सुवर्ण तर गुरपाल सिंग यांना रौप्यपदक पटकावले. जितूने १७४.१ गुण आणि गुरपालने १६७.० गुण मिळवत हे यश मिळवले.

यासह भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या सातवर पोहचली आहे. तर एकूण पदकांची संख्या २४ झाली आहे. यात १० रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे.पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे.

Leave a Comment