काँग्रेस-राष्ट्रवादीच महाराष्ट्र सदनाच्या कळीचे नारद – गडकरी

nitin-gadkari
नशिक : महाराष्ट्र सदनाच्या कळीचे नारद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे मत केंदीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र सदनप्रकरणी शिवसेना खासदारांना फसवून या दोन्ही पक्षांनी एनडीए सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न चालवले असल्याचे गडकरी म्हणाले.

गडकरी आज भाजपा कार्यकर्त्यांच्या सम्मेलनासाठी नाशिक येथे आले होते. यावेळी गडकरी म्हणाले, शिवसेना खासदारांनी महाराष्ट्र सदनातील निकृष्ठ दर्जाचे जेवण आणि अन्य सुविधांचा विरोध केला होता. समोर आलेल्या चित्रफितीनुसार शिवसेना खासदार कॅन्टीनमधील एका कर्मचाऱयाला निकृष्ठ दर्जाचे जेवण जबरदस्तीने भरवताना दिसत आहे. या कर्मचाऱयाला रोजा होता. यूपीएच्या घटक पक्षांनी या प्रकरणाला जातीय रंग दिला असून, वोटबँकेचे राजकारण हे दोन्ही पक्ष करीत असल्याचा आरोप गडकरी यांनी लावला.

यापूर्वी देशात यूपीएचे सरकार होते. यामुळेच राज्यात उपासमारीने होणाऱया मृत्यूला तेच जबाबदार आहेत. भाजपाप्रणित एनडीए सरकार शेतकऱयांच्या विरोधात नाही. कांद्याचे वाढते दर रोखण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर प्रतिबंध लावले आहेत. यावेळी गडकरींनी बिल्डर्स असोशिएशन द्वारा आयोजित दोन दिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन केले.

Leave a Comment