चौरंगी वन डे क्रिकेट स्पर्धेत भारत अ संघाचा विजय

mohit
ब्रिस्बेन : चौरंगी वन डे क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात भारत अ संघाने मनन व्होरा आणि मोहित शर्मा यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल परफॉर्मन्स संघाचा (एनपी) 6 गडय़ांनी पराभव केला. भारत अ संघाची या विजयामुळे या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्याची शक्यता वाढली आहे.

एनपी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 218 धावा जमविल्या. त्यानंतर भारत अ ने 38 षटकांत 4 बाद 219 धावा जमवून हा सामना जिंकला.

एनपी संघातर्फे ट्रेव्हिस हेडने 56 धावा जमविल्या. भारत अ तर्फे मोहित शर्माने 48 धावांत 4 तर अक्षर पटेलने 51 धावांत 2 गडी बाद केले. त्यानंतर भारताच्या डावात सलामीचा फलंदाज मनन व्होराने 95 चेंडूंत 12 चौकारांसह 88 धावा फटकाविल्या. त्याने अंबाती रायडूसमवेत चौथ्या गडय़ासाठी 108 धावांची भागीदारी केली. रायडूने 11 चौकारांसह नाबाद 80 धावा जमविल्या. या सामन्यात भारत अ ला 5 गुण मिळाले. भारत अ ने या स्पर्धेत आतापर्यंत तीन पैकी दोन सामने जिंकत 10 गुण घेतले आहेत.

Leave a Comment