इशांतला आणखी परिपक्व बनवेल लॉर्ड्सचे यश

ishant
लंडन – भारताची विजयी पताका लॉर्डसवर फडकवण्यात सिंहाचा वाटा उचलणारा ईशांत शर्माने अपेक्षेचे ओझे असले, तरी त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत, यावर ईशांत सांगतो की मी बळी मिळवले म्हणून लोक माझा उदोउदो करीत आहेत. पण समजा याउलट घडले असते, मला बळी मिळाले नसते किंवा मी धावा दिल्या असत्या, तर मला जयजयकाराऐवजी शिव्याशाप मिळाल्या असत्या. पण, मी सातत्याने बाउन्सरचा मारा करीत होतो, तेही 80 हून जास्त षटके वापर झालेल्या चेंडूने. हे सोपे काम नाही. बीसीसीआय टीव्हीशी बोलताना ईशांत सांगत होता. मी आता परिपक्व झालो आहे. कोणीही काहीही म्हंटले, तरी मला फारसा फरक पडत नाही. माङो सहकारी माङयावर विश्वास ठेवतात. मी काय करु शकतो, हे त्यांना माहीत आहे.

त्याच्या या प्रतिक्रियेने त्याच्या आयुष्यातील वेदना कळू शकते. भारतीय क्रिकेट संघातील स्थान हे त्याच्यासाठी मोरपिसांच्या गादीइतके सुखदायक नाही, हे सिद्ध होते. 2007 साली 19व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केलेल्या ईशांतचे करियर चढ-उताराने भरलेले आहे. पदार्पणात ईशांतकडून खूप अपेक्षा केल्या जात होत्या. 2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौ:यात त्याच्या एका कृतीने भारताला एका महान विजयाची नोंद करता आली. पर्थमधील कसोटी सामन्यात कर्णधार कुंबळेने त्याला ‘और एक ओव्हर करेगा’ असे विचारले, असता त्याने ‘हां मैं करुंगा असे उत्तर दिले. पर्थवरील उन्हात त्याने ते षटक टाकताना वेग आणि स्टॅमिना याच्याशी तडजोड न करता जीव तोडून गोलंदाजी केली. याचे फळ त्याला लगेच मिळाले, पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाज रिकी पाँटिंगची विकेट त्याने काढली. हा त्या सामन्यातील टर्निग पॉईंट होता. हा सामना भारताने जिंकून एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

Leave a Comment