राज्यात आतापर्यंत सरासरी ४७ टक्के पाऊस

rain
मुंबई – राज्यात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यातील सरासरीच्या ४७ टक्के पाऊस (234 मि.मी.) बुधवारपर्यंत राज्यात झाला आहे.

राज्यातील धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, अकोला, वाशिम, भंडारा, चंद्रपूर या १३ जिल्ह्यात २५ ते ५० टक्के, नाशिक, नंदूरबार, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ या ६ जिल्ह्यांत ० ते २५ टक्के,तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, सातारा, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली या १२ जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्के आणि सिंधुदुर्ग तसेच सांगली या दोन जिल्ह्यांत ७५ ते १०० टक्के पाऊस पडला आहे. परिणामी राज्यातील जलाशयात २९ टक्के साठा झाला असला तरी गेल्या वर्षी याच सुमारास ५१ टक्के पाणी साठा होता.तसेच राज्यातील खरीपाचे सरासरी क्षेत्र १३४.७० लाख हेक्टर असून २३ जुलैपर्यंत ३६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Leave a Comment