एजंटच्या बेजाबदारपणामुळे मलेशियात अडकले २१ विद्यार्थी

visa
ठाणे : व्हिसा एजंटच्या बेजाबदारपणामुळे सध्या मलेशियात ठाण्यातील हॉटेल मॅनेजमेंटचे 21 विद्यार्थी अडकले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील एसईएस महाविद्यालयातून 21 विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेउन मलेशियात शेफ म्हणून नोकरीसाठी गेले होते. मात्र, व्हिसा एजंटने त्यांची फसवणुक केल्याने हे सर्व विद्यार्थी सध्या मलेशियात अडकले आहेत. या विद्यार्थांना शेफ ऐवजी साफसफाईची कामे करावी लागत आहेत. दरम्यान, एसईएस महाविद्यालयाच्या वतीने या विद्यार्थांच्या सुटकेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन विद्यार्थांच्या पालकांना दिले आहे.

Leave a Comment