अजित पवारांनी साधला ठाकरे बंधूंवर निशाना

ajit-pwar
कोल्हापूर : सध्या कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात जाहीर भाषणात अजित पवार यांनी ठाकरे बंधुंना चांगलेच टोले हाणले आहेत. या मेळाव्यात अजित पवार यांनी शिवसेनासह मनसेवर जोरदार टीका केली आहे.

‘मातोश्रीत बसून डरकाळ्या काय फोडता… मातोश्रीतून बाहेर पडा’ असे म्हणत अजित पवार यांनी थेट शिवसेना पक्ष प्रमूख उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे.

तर, नाशिकच्या जनतेने राज यांना महापालिका दिली. मग ते काहीच सुधारणा का करू शकले नाहीत, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवरही निशाणा साधला आहे. ‘आधी नाशिक सुधारा, मग राज्याच्या गप्पा मारा’ असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना जोरदार टीका केली आहे.

Leave a Comment