भारत-इंग्लंड कसोटी अनिर्णित

india
नॉटिंगहम : भारताची इंग्लंड दौऱयातील पहिली कसोटी अनिर्णित झाली असून यासाठी स्टुअर्ट बिन्नी आणि भुवनेश्वर या तळाच्या फलंदाजांनी ठोकलेल्या अर्धशतकांमुळे भारताला यश आले.

दुसऱया डावात व सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय फलंदाजांनी ९ बाद ३९१ धावा केल्या. यामध्ये बिन्नीने १४४ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७८ धावांची दमदार खेळी केली. सलग दुसऱया डावातही भुवनेश्वर कुमारने अर्धशतक ठोकल. त्याने १३८ चेंडूत १० चौकारांसह नाबाद ६३ धावा केल्या.

भारतीय संघाने आदल्या दिवशीच्या ३ बाद १६७ धावेवरून खेळायला सुरूवात केली होती. मात्र, कोहली, राणे आणि धोनी झटापट बाद झाल्याने भारताची अवस्था ६ बाद १८४ अशी झाली असताना बिन्नीने जडेजा आणि भुवनेश्वरच्या साथीने दमदार खेळी करीत भारताला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढले.

Leave a Comment