मुंबई – स्वतः भुजबळांनी शिवसेनेच्या वाटेवर असल्याची बातमी निराधार असल्याचे सांगितले, मात्र भुजबळ उद्धव ठाकरेंना फोन करत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते मनोहर जोशींनी केला आहे.
शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात संशयाचे ढग जमा झाले आहेत. मनोहर जोशी म्हणतात, ‘छगन भुजबळ शिवसेनेत परत येऊ इच्छितात असे माझ्या कानावर अधूनमधून यायचे. उद्धव यांना त्यांचा फोनही यायचा. उद्धव ठाकरे त्यांना काहीतरी उत्तर द्यायचे. पण पुढं काहीच झालं नाही,’ असे सांगत जोशी यांनी शिवसेना सोडून गेलेल्या सर्वांनाच आपण पक्ष न सोडण्याचा सल्ला दिला होता. से म्हटले आहे.
दरम्यान, भुजबळ शिवसेनेत परतणार या एका वृत्तपत्राने छापलेल्या बातमीला स्वतः भुजबळ यांनीही फेटाळून लावले आहे. मात्र जोशी सरांच्या या
वक्तव्यामुळे भुजबळ यांच्या सेना प्रवेशाबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.