सर्वच पक्षांनी एकदा स्वतंत्र लढावे – अजित पवार

ajit-pawar
अहमदनगर – अहमदनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना-भाजपामध्ये युती ठेवायची की नाही यावरून राजकीय चर्चा सुरु असतानाच सर्वच पक्षांनी एकदा स्वतंत्र लढावे म्हणजे सर्वांना आपापली ताकद कळेल असे वक्तव्य केले.

भाजपाचे मधु चव्हाण यांनी कालच भाजपाच्या एका कार्यक्रमात शिवसेनेसोबत असलेली युती यापुढे न ठेवता राज्यातील विधानसभा निवडणुका भाजपाने स्वबळावर लढायला हवी अशी मागणी केल्याने, महायुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही मागणी शिवसेनेनेही गांभिर्याने घेतली असून २८८ जागांसाठी सज्ज राहावे असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सूचना केली आहे. युतीबाबत चर्चा सुरू असतानाच आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीला १४४ जागा दिल्या तरच आघाडी टिकेल अन्यथा पक्ष २८८ जागा लढेल असे अजित पवार यांनी वक्तव्य केले आहे. राज्यात आम्हाला अर्ध्या जागा मिळायला हव्या अशी मागणी करत अजित पवार म्हणाले की, एकदा सर्वच पक्षांनी स्वतंत्र लढायला हवे जेणेकरून सर्वांना आपापली ताकद कळेल. मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, मोदी सरकार शेतकरीहीत पाहत नाही. सिंचन घोटाळयावरून विनाकारण माझ्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला असेही अजित पवार म्हणाले.

Leave a Comment