भारत – पाकिस्तान क्रिकेट मालिकांना क्रिकेट बोर्डांचा हिरवा कंदील

indo-pak
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट बोर्डांनी क्रिकेट मालिका पुन्हा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

2015 ते 2023 या कालावधीत एकूण सहा मालिका खेळण्यावर बीसीसीआय आणि पीसीबीने सहमती दर्शवली आहे. त्यानुसार पुढील वर्षी डिसेंबरमध्ये भारत-पाक मालिका खेळवली जाण्याची शक्यता आहे.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये ही मालिका खेळवली जाण्याचे संकेत आहेत. 2006 नंतर टीम इंडियाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक क्रिकेट संबंध थंड पडले होते. 2012 च्या अखेरीस पाकिस्तानचा संघ भारतात तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत खेळला होता. त्यानंतर आता पुन्हा भारत-पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा क्रिकेट सामना पाहाता येणार आहे.

Leave a Comment