मोदींच्या प्रेमात राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड !

jitendra-awaha
पुणे – लोकसभा निवडणुकीत सोशल मिडीयाचा योग्य वापर केल्याने सत्ताधार्यांवर घरी बसण्याची वेळ ओढवली; पण नरेंद्र मोदी लाटेत काय घडू शकते आणि ते कसे घडू शकते ,हे मोदींच्या ‘ चाय पे चर्चा’ने दाखवून दिले आणि त्यांच्या या प्रयोगाची अनेकांना भुरळ पडली आहे, मोदींचा जो पेहराव आहे ,त्याचे अनुकरण सध्या सुरु झाले असले तरी ,राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर ‘चाय पे चर्चा’चा चांगलाच प्रभाव पडला आहे, त्यांनी ‘कॉफी विथ स्टुडंट्स’ हा प्रयोग राबविण्यास प्रारंभ केला आहे.

मोदींनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेला ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम देशभर चांगलाच गाजला मोदींना निवडणुकीत याचा चांगला फायदाही झाला. आता आव्हाडांनीही ‘कॉफी विथ स्टुडंट्स’ हा कार्यक्रम सुरू करत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे.त्यात कार्यक्रमाचे नाव ‘कॉफी विथ स्टुडंट’ असल्याने विद्यार्थ्यांना कॉफीही देण्यात आली. पण, कॉफीच्या मगने सर्वांचेच लक्ष वेधले. कारण या कपवर आव्हाड यांचे छायाचित्र होते.परिणामी आव्हाड हेच मोदींच्या प्रेमात पडल्याचे अधोरेखित झाले आहे.

Leave a Comment