कोकणात जनता म्हणते ,’राणे तुम्हाला शोधू कुठे ‘;सेनेची टीका

narayan-rane
कणकवली – लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कॉंग्रेसचे दिग्गज मंत्री नारायण राणे यांचा जनाधार आता संपला आहे अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केली आहे .

ते म्हणाले ,रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉ. नीलेश राणेंचा दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचा कोणताही महत्त्वाचा नेता सिंधुदुर्गात अद्यापही फिरकलेला नाही. तसेच या निवडणुकीच्या निकालानंतर नारायण राणेंच्या पाठीशी असलेला जनाधार संपलेला आहे, लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे आणि नारायण राणे यांचा १६ मे रोजी पराभव झाल्यानंतर ते दोघे अथवा काँग्रेसचा कोणताही महत्त्वाचा नेता सिंधुदुर्गात अद्यापही फिरकलेला नाही. त्यामुळे राणेंना मत देणार्‍या लोकांची ‘राणे तुम्हाला शोधू कुठे’ अशी अवस्था झाली आहे. तसेच भविष्यात राणे आपल्या कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडतील, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे . जिल्ह्यात राणेविरोधी लाट असतानाही ३ लाख ४३ हजार लोकांनी मतदान केले. त्यांना अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त करणे राणेंची नैतीक जबाबदारी होती, असेही नाईक म्हणाले.

Leave a Comment