मुंबईकरांवर महागाईची टांगती तलवार

vegetables
मुंबई – मागिल पंधरवड्यापासून पुणे- नाशिकहून मुंबईला येणा-या भाज्या, कांदे आणि बटाट्याची आवक कमी झाल्याने मुंबईकरांवर महागाईची टांगती तलवार आहे.कांदे- बटाट्याच्या दरात किलोमागे ५-६ रुपये वाढ झाली आहे. कांदा १८ ते २० रुपये आणि बटाट्याचे दर २४ ते २६ रुपयांवर पोहचले आहेत.पुणे- नाशिकच्या भाज्या पाऊस लांबल्याने आता दुष्काळी मराठवाड्यासह अन्य भागात तसेच नाशिकमधून गुजरातकडे या भाज्या जातात. यामुळे भाज्यांच्या मागणीत वाढ आणि पुरवठा कमी झाल्याने भाज्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत. पाऊस लांबल्याने ही स्थिती ओढवली आहे.

Leave a Comment