आधी धक्कादायक विधान नंतर ‘तो मी नव्हेच’

patil
मुंबई – प्रत्येक घरात पोलिस बंदोबस्त दिला तरी बलात्कार रोखता येणार नाही हे धक्कादायक विधान अंगलट येताच गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मात्र आता सारवासारव करताना ‘मी नव्हे त्यातला’ असा पवित्रा घेतला आहे. मुंबईत झालेल्या महिला सुरक्षा परिषदेत गृहमंत्र्यांनी हे वक्तव्य करून अकार्यक्षमता खुलेआम मांडली होती.

आर. आर. पाटील म्हणाले कि , उत्तेजक छायाचित्रे आणि बोल्ड जाहिराती हे बलात्कारांचे प्रमुख कारण आहे. मात्र अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात अत्याचार होण्याचे प्रमाण कमी आहे. पण प्रत्येक घरात पोलिस दिला तरीही महिलांवरचे अत्याचार रोखता येणार नाहीत. बलात्कार हे ओळखीच्याच व्यक्तींमुळे होतात, मग त्यात पोलिसांचा दोष कसा असा सवाल पाटील यांनी केला होता. खुद्द गृहमंत्र्यांनी असे धक्कादायक विधान केल्याने सर्वांनाच धक्का बसला,मात्र टीकेची झोड उठताच गृहमंत्री पाटील यांनी मात्र वक्तव्य अंगलट येत असल्याचे पाहून मी तसे काही म्हणालो नव्हतो ;पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास्त करण्यात आल्याचा दावा आता केला आहे.

Leave a Comment