आता राजकारण नाही ,समाजकारण करणार – सुशीलकुमार शिंदे

sushilkumarshinde
सोलापूर – मला राजकारणातून निवृत्त व्हायचे होते ;पण पक्षाने आदेश दिला आणि निवडणूक लढलो.मात्र माझ्या पराभवाला राहुल गांधी कारणीभूत नाहीत तर पक्षातीलच लोक कारणीभूत असल्याचे स्पष्ट करीत कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आता राजकारण नाही तर समाजकारणच करणार असल्याचे सांगितले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात दारूण पराभव झालेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षातील लोकांवरच पराभवाचा ठपका ठेवला आहे . आपल्या लोकांकडूनच दगा होणार याची कल्पना आली होती. त्यामुळेच निवडणुकीच्या काळात मी स्वत: सर्व सूत्रे हातात घेऊन सोलापुरात ठाण मांडले होते . पण जे व्हायचे ते झाले असे असले तरी माझा पराभव हा जनादेश आहे. तो स्वीकारायला हवा.असेही ते म्हणाले. शिवाय माझं नशीब चांगलं की डिपॉझिट जप्त झालं नाही,’ अशी कबुलीही त्यांनी दिली. आता आगामी काळात राजकारण करणार नसून पक्षाच्या माध्यमातून समाजसेवा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Leave a Comment