विधानसभा;राष्ट्रवादी म्हणते ,’हम साथ-साथ’

nawabmalik
मुंबई – लोकसभा निवडणुकीत दणदणीत झटका बसल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत आता सावध पवित्रा घेण्यात येत आहे,आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता एकमेकांची साथ सोडली तर काही खरे नाही हे ओळखून ‘हम साथ-साथ’चा नारा देण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आम्ही एकत्रच विधानसभा लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

राष्ट्रवादीच्या बैठकीत लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्याने विधानसभा निवडणूकीसाठी कोणताही वेगळा निर्णय घेण्याची गरज नाही. असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रच राहून विधानसभा निवडणूक लढवणार आहोत असे ते म्हणाले. लोकसभा निवडणूकीतील पराभवाचे चिंतन करण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक मुंबईत पार पडली आहे. या बैठकीत पराभवाच्या कारणांवर खल झाला.

Leave a Comment