दरवर्षी ५ हजार पाक हिंदूचे भारताकडे पलायन

pak2
इस्लामाबाद – पाक हिंदू कौन्सिलने सादर केलेल्या अहवालानुसार दर वर्षी किमान ५ हजार हिंदू भारतात पलायन करून जात आहेत. गेल्या दोन महिन्यात पाकिस्तानात अल्पसंख्यांक समुदायाच्या विरोधी घटनांत वाढ झाली असल्याचे कौन्सिलचे प्रमुख रमेशकुमार वाकवानी यांनी पाक संसदेत सांगितले आहे.

वाकवानी म्हणाले की कुराण जाळण्याच्या आरोपावरून पाक हिंदूवर अत्याचार केले जात आहेत. पाकिस्तानी घटनेनुसार सर्व नागरिकांना समान अधिकार आहेत आणि प्रत्येक आपल्या मर्जीप्रमाणे कोणत्याही धर्माचे पालन करण्यास स्वतंत्र आहे. तरीही हिंदू नागरिकांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे. हिंदू मुलींना पळवून त्यांच्याशी जबरदस्तीने विवाह करून त्यांना मुस्लीम बनण्यास भाग पाडले जात आहे.यासाठी सरकारने कठोर पावले उचलून अशा घटनांना आवर घातला पाहिजे.

अल्पसंख्यांकांवर व त्यातही हिंदूवर होत असलेल्या अत्याचारामुळे येथील हिंदू नागरिकांत असुरक्षिततेची भावना बळावत चालली आहे. व त्यामुळे संधी मिळेल तेव्हा भारतात पळून जाण्याचा ते प्रयत्न करतात असेही वाकवानी यांनी संसदेत सांगितले.

Leave a Comment