‘ नमोसरकार’चा जय घोष;देशाच्या गृहमंत्र्यांचाही पराभव

maha
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या निकालाने कॉंग्रेसला धक्का दिला आहे,देशाचे केंद्रीय गृहमंत्री असणार्या सुशीलकुमार शिंदे यांना दारूण पराभव पत्करावा लागला आहे, भाजपचे शरद बनसोडे हे तेथून विजयी झाले आहेत. संपूर्ण देशात भाजपचे कमळ फुलले असून नमोसरकारचा जय घोष सुरु झाला आहे.महाराष्ट्रात तर नांदेडमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसची लाज राखली आहे, त्यांचा विजय वगळता कॉंग्रेसची ‘दारू’ण अवस्था झाली आहे,राष्ट्रवादीचीही तीच गत आहे, काही उमेदवारांना पराभवानंतर थेट रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला आहे. तर मनसेचे वादळ पूर्णपणे शमले आहे.

कोकणात नारायण राणेंचा बालेकिल्ला ढासळला असून शिवसेनेने कोकण काबीज केले आहे ,सेनेचे उमेदवार विनायक राऊत विजयी झाले आहेत. काँग्रेसचे गुलाम नबी आझाद पराभूत झाले असून सातार्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयन राजे भोसले ३ लाख ६६ हजार ५९४ मतानी विजयी झाले आहेत . शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांच्याकडून काँग्रेसचे गुरुदास कामत पराभूत झाले तर उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून पूनम महाजन दिड लाख मतांनी विजयी ठरल्या आहेत येथून कॉंग्रेसच्या प्रिया दत्त पराभूत झाल्या आहेत. देशाच्या गृहमंत्र्याचा सोलापुरात पराभव झाला असून भाजपचे शरद बनसोडे विजयी झाले आहेत.

उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे गोपाळ शेट्टी यांचा तीन लाख मतांनी विजय झाला आहे. कल्याण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे दोन लाख मतांनी विजयी झाले आहेत . भिवंडीचे भाजप उमेदवार कपिल पाटील विजयी झाले असून नाशिकमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे ,तेथे छगन भुजबळांना धक्का बसला असून सेनेचे हेमंत गोडसे विजयी ठरले आहेत. मनसेचा तर डबा गुल झाला आहे . दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे विजयी झाले आहेत.

Leave a Comment