मतांसाठी भाजपचे षडयंत्र – अजित पवार

भुसावळ – बारामतीत  प्रचार संपल्यानंतर माझ्या  आवाजाची ध्वनिफीत ही मुळात बोगस आहे, बारामतीच्या ग्रामस्थांना कधी धमकावलेच नाही. हे सगळे मतदारांची दिशाभुल करण्यासाठी भाजपचे षडयंत्र आहे,मतांच्या समीकरणासाठी त्यांचे हे उद्योग असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी भुसावळ येथे हे वक्तव्य केले.   भाजपने आपल्याबद्दल खोटा प्रचार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच माझ्य़ावर केलेल्या आरोपांची शहनिशा काही इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या प्रतिनिधींनी केली आहे.त्यांना काहीच आढळले नाही असेही पवार म्हणाले. बारामतीच्या ग्रामस्थांना कधी धमकावलेच नाही. हे सगळे मतदारांची दिशाभुल करण्यासाठी भाजपचे षडयंत्र आहे.  मतांसाठी भाजपने हे षडयंत्र रचल्याचे म्हटले आहे. पाणी तोडण्याची धमकी दिल्याची तक्रार विरोधी उमेदवारांनी दिली असून अजित पवार यांच्यावर  अदखलपात्र गुन्हाही दाखल झाला असून निवडणूक आयोगाने अहवालही मागविला आहे. 

 

Leave a Comment