सात रूपयांत बोला मनसोक्त – भारती एअरटेलची योजना

देशातील नामवंत टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अनोखी योजना जाहीर केली आहे. त्यानुसार रात्रीच्या वेळात ग्राहक केवळ ७ रूपये भरून अनलिमिटेड युसेज सर्व्हिस पॅक मिळवू शकणार आहेत.देशातील अशा प्रकारची ही पहिलीच योजना असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.

या योजनेनुसार रात्री १२ ते सकाळी ६ या वेळात ७ रूपये भरून युजर लोकल एअरटेल नंबरवर कितीही कॉल करून मनसोक्त बोलू शकणार आहेत. ग्राहकांसाठी कंपनी फेसबुक अॅक्सिसही मोफत पुरविणार असून त्यासाठी १२९ डायल करून अॅक्सिस अक्टीव्हेट करता येणार आहे. युजर ८ रूपये भरून याच वेळात अनलिमिटेड टूजी मोबाईल इंटरनेट वापरू शकतील तर १५ रूपये भरल्यास या दोन्ही सेवा युजरला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

गुजराथ, महाराष्ट्र, म.प्र.,उ.प्र., कोलकाता, हरियाना, केरळ, पंजाब, ओडिशा या राज्यात ९ रूपये भरून युजर अनलिमिटेड २ जी मोबाईल सेवा घेऊ शकणार आहेत. तसेच थ्री जी साठी रात्री ५०० एमबी २९ रूपयांत, १ जीबी ४९ रूपयांत ग्राहकांना मिळणार आहे. देशभरात एअरटेलचे २० कोटी ग्राहक आहेत.

Leave a Comment