
सांगली – आंदोलने ,उपोषण करताना सर्वसामान्य नागरिकांना साद घालून ‘आम आदमी’ या पक्षाचा जन्म घालणाऱ्या आपच्या नेत्यांनी आता कसले आंदोलन आणि कसले उपोषण असा पवित्रा घेतला आहे. आंदोलनातून आम आदमीची सहानभूती मिळवणाऱ्या ‘आप’च्या कारभार्यांनी दिल्लीत ४९ दिवसांची सत्ता भोगली पण दिलेले आश्वासन कसे अंमलात आणायचे या पेचात अडकलेल्या आपने सर्व खापर राजकीय पक्षावर विशेषतः सत्ताधार्यांवर फोडले.ही पार्श्वभूमी असणारी आम आदमी पार्टी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा जनतेला साद घालत आहे.
