युवराजचा बचाव करतोय सचिन

मुंबई- बांगलादेशमध्ये पार पडलेल्या ट्वेन्टी – २० विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये श्रीलंकेकडून टीम इंडियाला पराभव पत्कगरावा लागला. यामुळे टीम इंडियाचे प्रशंसक पेटून उठून आले आहेत. या सामन्यालत युवराज सिंहने फलंदाजी करताना झटपट धावा न जमविल्याडने टीम इंडियाचा पराभव झाला असे समर्थकांचे म्हंणने आहे. मात्र सर्वांकडूनच टीकेचा भडीमार सहन करणा-या युवराजच्या पाठीशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उभारला असून त्यांणने युवराजला दिलासा देण्याचचा प्रयत्नी केला आहे.

युवराज सिंहच्या निराशजनक कामगिरीमुळे फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला असे सर्वांचे मत बनले आहे. युवराजने या सामन्यात २१ चेंडू खेळून केवळ १० धावा केल्या. त्या मुळे फॅन्सची निराशा केली, त्यामुळे सोशल नेटवर्किंगवर युवीवर अतिशय वाईट पद्धतीने टीका करण्यात येत आहे.

दोन दिवसांपासून सतत टीकेचा भडीमार सहन करणा-या युवराजला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिलासा दिला आहे. सचिन तेंडुलकर युवराजच्या बचावासाठी उभा राहिला आहे, यावेळी बोलताना सचिन म्हाणाला, लवकरच टीकाकारांना युवराज आपली योग्यता सिद्ध करून दाखवेल आणि आगामी काळात होत असलेल्या सामन्यांत दमदार बॅटिंग करतांना दिसेल. रविवारचा दिवस युवीसाठी अतिशय कठीण दिवस होता, त्याच्यावर टीका होऊ शकते, पण यासाठी त्याला सुळावर चढवल्या सारखं करू नका, आणि आगामी काळात त्याजला लगेचच टीम बाहेर करू नका. आम्हाला सर्वांना युवीच्या साहसी खेळीवर गर्व आहे.

Leave a Comment