बचत खात्यावर यापुढे दंड नाही- आरबीआय

नवी दिल्ली- कोणत्याही बॅंकेतील खातेदाराच्या खात्यावरील किमान रक्कम कमी झाली तरी यापुढे दंड आकारू नये, असे निर्देश भारतीय रिझर्व बॅंकेने (आरबीआय) इतर बॅंकांना दिले आहेत.  देशातील विविध बॅंकांमध्ये कोट्यवधी खातेदारांची बचत खाती आहेत. ग्राहकांना आपल्या खात्यावर किमान रक्कम ठेवावी लागते. मात्र, त्यापेक्षा रक्कम काढली गेल्यास दंड आकाराला जातो. परंतु, यापुढे बॅंकांनी दंड आकारू नयेत, असे ‘आरबीआय’ने म्हटले आहे.  

ग्राहक आर्थिक उलाढालीसाठी एटीएम व इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत. यामुळे ग्राहकांच्या उलाढाली वाढल्या असून, त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ग्राहकांची खात्यावरील किमान रक्कमेपेक्षाही रक्कम खाली आल्यास त्यांना दंड आकारण्याऐवजी कोणत्या सेवेला मुकणार आहात याची माहिती द्यावी, असेही ‘आरबीआय’ने म्हटले आहे.