मनसेमुळे महायुतीत तणाव होता-उध्दव ठाकरे

मुंबई- काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये मनसेला समाविष्ट करण्यावरून तणाव निर्माण झाला होता असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कबुली दिली आहे. आगामी काळात होत असलेल्यार निवडणूकीच्याे पार्श्वभूमीवर `सामना` या शिवसेनेच्या मुखपत्रातून उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा अंतिम भाग प्रकाशित झाला आहे. या मुलाखतीच्या अखेरच्या भागात जनतेच्या मनातील ‘मनसे’पासून ‘हिंदुत्वा’पर्यंतच्या अनेक प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी उत्तरे दिली आहेत. त्यामध्येच त्यांनी मनसेबाबतचा खुलासा केला आहे.

यावेळी पुढे बोलतना उद्धव ठाकरे म्हणाले, आगामी काळात ‘मनसे’ कोणत्याही परिस्थितीत महायुतीत सामील होऊ शकत नाही. मोदी आणि राजनाथसिंह यांनी तसे स्पष्ट केले आहे. आगामी काळात होत असलेल्या ‘मतफुटी’ची भीती बाळगू नका. जनता स्थिर आणि मजबूत सरकारसाठी मतदान करील आणि ‘मतफुटी’वाल्यांना उडवून लावेल.

गेल्या काही दिवसांपासून असलेल्या तणावाच्या वातवरणानंतर आता भारतीय जनता पक्षाशी कधी नव्हे ते सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. मधल्या काळातील तणाव हा एका व्यक्तीमुळे निर्माण झाल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी मारला. ‘आप’चा झाडू महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही. शिवसेना हाच येथे आम जनतेचा आवाज आहे. केजरीवाल हे पळपुटे आहेत. त्यांना महाराष्ट्रात थारा नाही, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच केले आहे.

Leave a Comment