मोठा विजय मिळविल्यास टीम इंडिया सेमीफायनलमध्ये

ढाका : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात टीम इंडियाने सुरुवातीचे दोन सामने जिंकून शानदार सुरूवात केली आहे. दरम्यान टीम इंडियाला शुक्रवारी यजमान बांगलादेशचा सामना करायचा आहे. या सामन्यातत टीम इंडियाने बांगलादेशवर मोठा विजय मिळवला तर टीम इंडिया सेमीफयानलमध्ये पोहचणार आहे. त्यामुळे टीम इंडियाने पाच दिवसांपासून त्यासाठी मोठा सराव केला आहे.

या स्पर्धेतील सुरूवातीच्या दोन सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजला हरवल्याने धोनी ब्रिगेडचा आत्मविश्वास उंचावला आहे. अमित मिश्राचा फिरकी मारा या दोन्ही सामन्यात निर्णायक ठरला. तर रोहित शर्मा, सुरेश रैना, विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा ओघ वाहतो आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड आहे. आतापर्यंत टी२० मध्ये टीम इंडियाने बांगलादेशकडून पराभव स्वीकारलेला नाही.

आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यात युवराज सिंगच्या फॉर्मवर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यारमुळे या सामन्यासत आता युवराज सिंगला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. त्या्च्याम कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आजचा सामना जिंकून टीम इंडिया सेमीफायनलमध्ये धडक मारतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment