मुंबई / प्रतिनिधी -शिवसेनेत जावून बदेकारांचे जे झाले तेच मांजरेकरांचे होणार अशी प्रतिक्रिया आप चे मयंक गांधी यांनी दिली असून शिवसेना ,म न से आणि काँग्रेस यांच्या पेक्षा लोक आप ला जवळ करतील असे त्यांनी सांगितले तर शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांनी सांगितले कि गेल्यावेळी माझा पराभव हा म न से मुळेच झाला हे खरे आहे पण आता म न से काय आहे हे सर्वांना समजून चुकले आहे त्यामुळे आता माझा विजय निश्चित आहे असे ते म्हणाले
किर्तीकर पुढे म्हणाले चित्रपटातला व्हिलन अशीच प्रतिमा मांजरेकारांची आहे .गेल्यावेळी लाखभर मते मनसे ने घेतली होती आता ४० हजार हि मते त्यांना मांजरेकर उमेदवार दिल्याने आणि आता मनसे चा अनुभव लोकांना आल्याने मिळणार नाहीत गेल्यावेळी माझा पराभव अवघ्या ३८ हजारांनी झाला होता . पेट्रोल, ग्यास आदी जीवनावश्यक वस्तूंची महागाई यामुळे काँग्रेस ला आता जनता कंटाळली आहे आप हा भुलभुलैय्या आहे आणि मनसे हा केवळ भ्रम आहे हे लोक जाणून चुकले आहेत . शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आताचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याच विचारांशी लोक सहमत होवून सगळीकडेच शिवसेनेला साथ देतील असे ते म्हणाले