
मुंबई – सिंचन घोटाळ्यामुळे बदनाम झालेल्या सरकारला राज्याचे राज्यपाल के. शंकरनारायण यांनी सणसणीत चपराक लगावली आहे. विदर्भाच्या सिंचनाचे अन्यत्र वळवलेले 1402 कोटी रुपये विदर्भाला परत करा, असे लेखी निर्देश राज्यपालांनी राज्य सरकारला दिले आहे. विदर्भ सिंचन महामंडळाच्या तक्रारीनंतर राज्यपालांनी सिंचनाच्या जमा-खचार्ची तपासणी केली आहे. तपासणीत राज्यपालांच्या पुर्वपरवानगी शिवाय विदर्भाच्या सिंचनाचे पैसै दुसरीकडे वळवल्याचे उघड झाले.
