संजयसारखाच न्याय प्रज्ञासिंगला का नाही? उद्धव ठाकरे

मुंबई – संजय दत्तला जो न्याय लावला जातो तसाच साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहित यांना का लावला जात नाही असा सवाल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला आहे. संजय दत्तला वारंवार मंजूर केल्या जात असलेल्या पॅरोलवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, मालेगांव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर अद्यापी गुन्हा सिद्ध झालेला नाही. तरीही गेली पाच वर्षे त्यांना तुरूंगवास भोगावा लागतो आहे.

संजय दत्त यांचा गुन्हा शाबित झाला आहे. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, तेथे जातीधर्म पंथाचा संबंध नाही. मात्र तरीही संजय दत्त याला आत्तापर्यंत चार वेळा पॅरोल दिला गेला आहे. सर्वांना समान न्याय दिला गेला पाहिजे आणि संजयला लावलेला न्याय प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांनाही लावला गेला पाहिजे. त्यांच्यावरचे आरोपच सिद्ध झालेले नाहीत.

Leave a Comment